BREAKING NEWS

Friday, September 16, 2016

हिंदूंच्या सणांबाबत बोलणारे पुरोगामी पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करण्याविषयी काहीच बोलत नाहीत ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

मुंबई - मांढरदेवीच्या यात्रांमध्ये दिल्या जाणार्‍या पशूंच्या बळीसंदर्भात किंवा तथाकथित पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात पुरोगामी सातत्याने बोलतात; मात्र पर्यावरणपूरक बकरी ईद साजरा करण्याविषयी मात्र काहीच बोलत नाहीत, याकडे सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी लक्ष वेधले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील बकरी ईद पर्यावरणपूरक साजरी करता येईल का ? या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक आणि एम्आयएम् पक्षाचे आमदार अधिवक्ता वारिस पठाण उपस्थित होते. मयुरेश कोण्णूर यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी बकरी ईद हा सण इकोफ्रेंडली का होऊ नये ? असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
      श्री. वर्तक पुढे म्हणाले, बकरी ईदच्या दिवशी दीड कोटींहून अधिक पशूंची हत्या केली जाते. यामुळे अनुमाने साडेतीन लाख लिटर रक्त पाण्यात मिसळले जाते, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. पंढरपूर येथील चंद्रभागा, विदर्भामधील नदी येथे नद्यांचे पाणी रक्तबंबाळ झाल्यामुळे लोक पाणी पिऊ शकत नाहीत. फाळणीनंतर मुसलमानांची लोकसंख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे बकर्‍यांची कत्तल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या सर्वांमुळे मानवी जीवन धोक्यामध्ये आले आहे; मात्र मुसलमान समाज यासंदर्भात २ पावले मागे यायलाही सिद्ध नाही.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.