BREAKING NEWS

Saturday, September 3, 2016

विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी करावी लागते कसरत; मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष- जिल्हा परिषद शाळेच्या आवारात साचते पावसाचे पाणी


चांदूर रेल्व- (शहेजाद खान)
शहरातील शैक्षणिकदृष्ट्या प्रथम क्रमांकावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेची आता दुरवस्था होत असून ऐन पावसाळ्याच्या दिवसात शाळेच्या आतील पटांगणात पावसाचे पाणी जमा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना जाणे-येण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या बाबीकडे मुख्याध्यापकांचे मात्र दुर्लक्ष होत आहे.

शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली चांदूर रेल्वे येथील जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यात एक नामांकित व मेरिट विद्यार्थी घडविणारी शाळा म्हणून ख्याती प्राप्त आहे. लाखो रूपये खर्च करून या शाळेची इमारत बांधण्यात आली. परंतु शाळेच्या आतील भागाच्या पटांगणात मातीच होती. त्यामुळे पावसाळ्यात पटांगणात चिखल होत होता.

याची दखल घेऊन काही महिन्यांपूर्वी आतील पूर्ण पटांगणाच्या परिसराला पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले होते. यासाठी हजारो रूपये खर्च करण्यात आले.

तरी पण पावसाळ्यात मात्र पावसाचे पाणी पटांगणात जमा राहते. त्यामुळे पटांगणातून जाणे-येणे करण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. तसेच साचत असलेल्या पावसामुळे डासांची उत्पत्ती होवून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही व या ठिकाणी यात घसरून विद्यार्थीसुद्धा जखमी होऊ शकतात. मात्र या बाबीकडे मुख्याध्यापक सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

या शाळेत अंदाजे १२०० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.