सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी
![]() |
पोलीस उपअधीक्षक श्री. पवार (डावीकडे) यांना निवेदन देतांना |
निवेदनात म्हटले आहे की,....
१. ओवैसी बंधूंनी आजपर्यंत विखारी भाषणांद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे देशातील सामाजिक सलोखा बिघडून अनेक ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. २. लातूर येथील जाहीर कार्यक्रमात असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते की, माझ्या मानेवर कुणी सुरी ठेवली, तरी मी भारतमाता की जय म्हणणार नाही. आमदार वारीस पठाण यांनी विधानसभेत मी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे विधान केले होते.
३. देशद्रोही याकूब मेनन याला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फाशीची शिक्षा सुनावल्यावरही त्याची बाजू असदुद्दीन ओवैसी यांनी घेतली होती आणि याकूबला न्याय मिळाला नाही, असे विधान केले.
४. मध्यप्रदेश कारागृहातून पळून जाणार्या सिमीच्या ८ आतंकवाद्यांचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्यांचीही बाजू घेत ओवैसी यांनी मुसलमान असल्याने असे प्रकार घडत आहे, असे विधान केले.
५. भाग्यनगर येथून आय्.एस्.आय्.शी संबंध असल्याच्या कारणावरून ११ मुसलमान युवकांना अटक करण्यात आली. या राष्ट्रद्रोही तरुणांना आमचा पक्ष वकिली साहाय्य देईल, असे ओवैसी म्हणाले.
६. वर्ष २०१३ मध्ये आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी केवळ १५ मिनिटे पोलिसांना बाजूला काढा. २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना धडा शिकवतील, असे हिंदुद्वेषी वक्तव्य केले होते.
Post a Comment